नैसर्गिक चिकणमाती - शाडूमाती म्हणून ओळखली जाते. ही एक अनूतनीकरणीय संसाधन आहे जी भारताच्या विविध भागातून उत्खनन केली जाते आणि धार्मिक मूर्तींमध्ये रूपांतरित करण्यासाठी शहरांमध्ये पाठविली जाते. पीओपीच्या वापरावर बंदी घातल्यानंतर नैसर्गिक मातीचा पारंपरिक वापर वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे आणखी एक पर्यावरणीय आपत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याचबरोबर हे ही लक्षात घ्यायला पाहिजे की मातीच्या मूर्ती नैसर्गिक पाणवठ्यामध्ये विसर्जित केल्या जातात तेव्हा त्या नदीच्या पात्रावर एक अभेद्य थर तयार करतात जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
सध्या विसर्जनानंतर गोळा केलेला चिकणमातीचा गाळ एकतर शहराभोवतीच्या मोकळ्या पडीक खाणींमध्ये टाकला जातो किंवा त्यातील काही भाग पुन्हा नदीत टाकला जातो.
स्रोत: गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्प लि.
उपाय
नवीन गणेशमूर्तींची पुनर्निर्मिती करण्यासाठी मूर्तिकारांना नैसर्गिक चिकणमाती सहजपणे पुन्हा वापरता येते आणि तिचा पुनर्वापर करता येतो. हे सक्षम करण्यासाठी चिकणमातीचा गाळ काळजीपूर्वक साठवून स्वच्छ पद्धतीने गोळा करावा लागतो आणि मूर्तिकारांना परत करावा लागतो.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२० साठी CPCB मार्गदर्शक तत्त्वे मातीच्या गाळाच्या पुनर्वापराची शिफारस करतात.